Friday, February 18, 2022

शिवाजी महाराज - युवकांचे प्रेरणास्थान | Chhatrapati Shivaji Maharaj | Chhatrapati Shivaji Maharaj Biography


                        'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असे नारे आपल्याला दोन च दिवस ऐकायला मिळतात ते म्हणजे शिवजयंती तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे. ३६५ दिवसातून दोन दिवस जर सोडले तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव म्हणून राहते. शिवजयंती उत्सव आला की तेव्हाच आपल्यातला शिवप्रेमी जागा होतो. डिजे लावणार, बाईक रॅली काढणार, कल्ला-हल्ला करणार तो फक्त दोन दिवस. का बरं नाही करणार आमच्या राज्याची जयंती दोन वेळेस तर येते तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे. हा ते बर की आम्ही दोन दिवसचं महाराजांना पुजतो.  

                काही वर्ष झाले एक नविनच ट्रेण्ड युवापिढी मध्ये दिसत आहे. आपल्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काय, त्यांचे चित्र काय, भगवा ध्वज काय असे अनेक गोष्टींचा प्रभाव जरा जास्तच वाढला आहे. अहो, मला सांगा आता गाडीवर ध्वज, चित्र, नाव काढल्यानी कुठला शिवप्रेम जागा होतो. गाडीवर ना ना प्रकारचा धूळ बसतो, कुत्री घाण करतात अशा कित्येकदा अपमान होतो हो महाराजांचा. अशा नी नाही होत हो शिवभक्ती. आणि खरचं महाराजांना खुश करायचे असेल तर त्यांचा विचारांचा आदर आणि आचार विचारांवर अंमलबजावनी करा.
                    शिवछत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक मनोरंजनाचे साधन तसेच वादविवाद निर्माण करण्याचे एक साधन झाले आहे. ज्या रस्त्यावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे त्याच रस्त्यावर आपले मायलेक सुरक्षित राहू शकत नाहीत. कस होणार या देशाचं. तुम्हाला नाही वाटत का ? काही बदल व्हायला हवा. शिवसाम्राज्य पुन्हा व्हायला हवे. 



                    आपल्या युवापिढीलाच त्याचा पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते. आपली शिवभक्ती फक्त शिवजयंती पर्यंत मर्यादित नसून ३६५ दिवस महाराजांच्या विचारांवर अंमलबजावणी केली पाहिजे. महाराजांच्या जन्मापासून अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या जीवनशैलीत त्यांचा वापर केला पाहिजे. महाराज्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास अनेक पुस्तकात वाचायला मिळेल. महाराजांच्या काही गोष्टी युवकांनी नक्की आपल्या विचारात आणायला पाहिजे आणि त्यावर ठाम राहायला पाहिजे.
                    
  तर आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊया...
                      
प्रथम :- स्त्रियांबद्दलचा आदर 

             शिवछत्रपतींच्या राज्यात सर्व स्त्रियांना एकच मानसन्मान मिळायचा. ना कुणाबरोबर अन्याय व्हायचा, ना कुठल्याही महिलेची चेष्टा व्हायची. अहो स्वताच्या राज्यातील महिला तर महिला इतर राज्यातील महिलांना सुद्धा तोच मानसन्मान मिळायचा. महाराजांच्या काळात कुठल्याही स्त्री बरोबर अत्याचार झाले नाही. जर कुणी स्त्रियांचा हात देखील जबरदस्तीने धरला तर त्याचे हात कापून ठेवायचे येवढे महाराज कर्तव्यनिष्ट होते. 
  
      हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे.
      

दुसरा :- वेळेचा पुरेपूर वापर

                       शिवबा हे वेळेचे एकदम पक्के होते. महाराजांना 'The Management Guru' असे देखील म्हणतात. महाराजांनी फक्त मूठभर मावळे हाती घेऊन मुघलांच्या विरोधात जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असे अनेक कार्य वयाच्या ५० वर्षात महाराजांनी पूर्ण केले. आपण आपली कामे वेळेच्या आत पूर्ण केलीत तर आपले मावळे देखील आपली कामे वेळेच्या आत करण्यासाठी झटतात. हे तत्त्व महाराजांना चांगलेच माहिती होते. म्हणून कामे वेळेवर करणे, आजचे उद्यावर न टाळता ते आजच पूर्ण करायचे हे महाराज आपल्या वर्तवणुकितून मावळ्यांना दाखायचे. महाराजांनी कधीच कुठलेही कारण दिले नाही कारण त्यांच्या पाठीवर हिंदवी स्वराज्याची जबाबदारी होती. 
                       हे आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे.


तिसरे :- कमी वयात नवनविन गोष्टी शिकल्या

              महाराजांनी आपले बालपण अनेक गोष्टी शिकण्यात वेळ दिला. तलवारबाजी असो वा घोडेस्वारी या बाबतीतही शिवबा पारंगत होते. महाराज एकही दिवस न चुकता दररोज तलवारबाजी चा सराव करायचे. रोज आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करायचे. महाराजांचे अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी आपल्या बाल वयात केल्या. त्या आपल्याला अनेक पुस्तकात वाचायला मिळेल. जसे महाराजांनी आपले बालपण अनेक गोष्टी शिकण्यात वेळ दिला तसे आपण सुद्धा आपल्या बालपणात अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे. एकदा बालपणात मुलाला जी शिकवण लागली तीच त्याला पुढे घडवते. 

       हे आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे.


             शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जितके सांगाल तितके कमीच आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना पासुन ते गडकिल्ले जिंकण्यापर्यंतचा अतिशय मोठा असा इतिहास आपल्याला अनेक पुस्तकात वाचायला मिळेल. पण आपण जर महाराजांच्या या तीन गोष्टींचे पालन जर केले तर नक्कीच आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होईल. शिवछत्रपती नुसतेच शिवजयंती पर्यंत मर्यादित नसून एकूण एक दिवस व त्यांच्या विचारांचा आदर आपण केला पाहिजे. हीच खरी महाराजांची शिवजयंती म्हणून ओळखली जाईल. 

३३ कोटी देवानंतर एक देव असा होऊन गेला ज्याच्यामुळे आमच्या घरातील माय आणि गोठ्यातील गाय ही सुरक्षित आहे. 

बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की......
              

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box

My Blog List