Thursday, December 8, 2022

म्यूचुअल फंड क्या है?

 म्यूचुअल फंड एक ऐसा रास्ता है जिसमें भविष्य के लिए आप उपयुक्त और सुरक्षित ब्याज अर्जित करने के लिए हर महीने एक निश्चित राशि का निवेश करते हैं। तो चलिए अब संक्षेप्तरूप में म्यूचुअल फंड के बारे में जानते हैं। म्यूचुअल फंड ये शेयर बाजार का एक हिस्सा है। फर्क सिर्फ इतना है कि शेयर बाजार में आपको अपना समय निवेश करना होता है और खुद सीखना होता है, और म्यूचुअल फंड में हम किसी प्रमाणित व्यक्ति या प्रमाणित कंपनी के माध्यम से अपना पैसा घुम फिरकर शेयर बाजार में लगा सकते हैं। म्यूचुअल फंड में आम तौर पर हम दो तरह से निवेश कर सकते हैं, Lumpsum और SIP (Systematic Investment Plan )।




म्यूचुअल फंड में पैसा कैसे बढ़ता है?


 शेयर बाजार हो या म्यूचुअल फंड, सभी की प्रगति पंजीकृत कंपनी पर निर्भर करती है। जैसे-जैसे कंपनी बढ़ेगी, वैसे-वैसे उनकी बिक्री भी होगी। और अगर बिक्री बढ़ती है तो निश्चित रूप से कंपनी अच्छा लाभ कमा सकती है, और अगर कंपनी लाभ कमाती है, तो उस लाभ का एक छोटा सा हिस्सा उस कंपनी के निवेशकों को ब्याज के रूप में म्यूचुअल फंड के माध्यम से दिया जाता है।


निवेश करना चाहते हैं ! लेकिन सही कंपनी की पहचान कैसे करें?


शेयर बाजार हो या म्यूचुअल फंड एन दोनो में निवेश करते वक्त सबसे पहला सवाल यही उठता है कि किस कंपनी के म्यूचुअल फंड में निवेश किया जाए। क्‍योंकि म्यूचुअल फंड में कई कंपनियां रजिस्‍टर्ड भी होती हैं। तो इन सभी कंपनियों में से सही कंपनी की पहचान कैसे करें इसका जवाब आपको कोई नहीं बताएगा। इसकी वजह है आ


ज के दौर का कॉम्पिटिशन। अगर वह आपको अपना सक्सेस मंत्र बता दे तो आप उससे भी ज्यादा ताकतवर हो जाओगे ऐसा उसे लगता है। इसी कारण से अपने अंदर के गुण कोई किसी को नहीं सिखाता। हाँ ! ऐसी ही है आज के बदलते दौर का नजरिया। तो ये सवाल है ! तो जवाब भी होगा। इसका उत्तर यह है कि हमें इसके बारे में भी पता लगाना होगा। इसे हम कई किताबों से और साथ ही Google देवता के माध्यम से महत्वपूर्ण जानकारी निकाल सकते हैं। इसका सीधा सा जवाब है कि आपको उन कंपनियों में निवेश करना चाहिए जिनके उत्पादों या सेवा का आपने अनुभव लिया हो।


शेयर बाजार या म्यूचुअल फंड के मध्यम से भारत देश को कैसे फायदा हो सकता है ?


 अब जाहिर सी बात है कि, जैसे-जैसे भारतीय कंपनियां बढ़ेंगी, उस दौरान भारत का आर्थिक विकास भी होगा। यदि हमारा देश आर्थिक रूप से विकसित करना चाहते हो, तो बड़ी कंपनियों के साथ-साथ छोटे-छोटे उद्यमियों को अधिक मेहनत देकर अपने शहर का विकास करना होगा। शहर के विकास से राज्य का विकास होगा, और जब राज्य का विकास होगा तो भारत देश का भी विकास होणा निच्चीत है | इसे भारत की वास्तविक प्रगति के रूप में जाना जाएगा |      


 


शेयर बाजार और म्यूचुअल फंड को लेकर लोगों की राय ?


अब आम तौर पर लोग निवेश के बारे में नकारात्मक राय रखते हैं चाहे वह शेयर बाजार हो या म्यूचुअल फंड| उनको अगर पुछो निवेश क्या हैं ? तो उनसे केवल एक ही उत्तर की अपेक्षा की जाती है, शेयर बाजार लोगों को धोखा देता है, इसलिए हम इसमें निवेश नहीं करते हैं। अब हमें उनसे बहस करने की बजाय इस बारे में कुछ जानकारी समझकर बतानी चाहिए। इस दुनिया में हर कोई कुछ नया सीखना चाहता है ! लेकिन यहां सवाल उठता है कि उन्हें सही मार्गदर्शन नहीं मिल रहा है। अगर हम उनके मन से शेयर बाजार के बारे में संदेह को दूर कर दें, तो निश्चित रूप से हम कुछ नया सीखेंगे और अपने देश के निर्माण में एक छोटा सा योगदान करेंगे।



निवेश कैसे शुरू करें?


सब कुछ पढ़ने के बाद आप सोच रहे होंगे कि अब हम कहां से शुरू करें। अगर आप सच में इसके बारे में कुछ सीखना चाहते हैं और पैसा लगाना चाहते हैं तो सबसे पहले उस कंपनी के बारे में कुछ जानकारी जुटा लें। आपको वास्तव में किस कंपनी में निवेश करना चाहिए ? सही कंपनी की नेट वर्थ के बाद हमें यह सोचना चाहिए | इसका भी विचार करे कि हम हर महीने कितना पैसा जमा कर सकते हैं और उसी राशि को म्यूचुअल फंड में निवेश कर सकते हैं। यदि हम कुछ वर्षों तक औसतन ऐसा करते हैं, तो निश्चित रूप से हम 40 वर्ष की आयु तक आर्थिक रूप से स्वतंत्र हो सकते हैं।


तो सोच क्या रहे हो, आज ही शुरू करें ! और अनुभव ले नये दौर का |


                                                                                          लेखक

प्रथमेश राजू गणेशकर

(बी.कॉम, डी.टैक्स, जी.डी.सी.अँड ए )

म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

"म्युच्युअल फंड" हा एक असा मार्ग आहे ज्यामध्ये आपण दर महिन्याला निश्चित पैशांची गुंतवणूक करून भविष्यासाठी योग्य आणि सुरक्षित असे व्याज मिळण्यासाठी तयार केलेला मार्ग. तर आता आपण म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर म्युच्युअल फंड हे शेअर बाजार मधील फक्त एक भाग आहे. त्यामध्ये फरक एवढाच असतो कि, शेयर बाजार मध्ये आपल्याला वेळ देऊन तसेच स्वतः शिकून पैशाची गुंतवणूक करावी लागते. आणि म्युच्युअल फंड मध्ये आपण एका प्रमाणित व्यक्तीला किंवा प्रमाणित कंपनीच्या माध्यमातून आपण आपले पैसे शेयर बाजार मध्ये गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये साधारणतः आपण दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो. एक म्हणजे Lumpsum गुंतवणूक आणि दुसरे म्हणजे SIP (Systematic Investment Plan).

गुंतवणूक तर करायची आहे पण योग्य कंपनी कशी ओळखावी ?

शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करत असतांना सर्वात पहिला प्रश्न असा पडतो ते म्हणजे कोणत्या कंपनी च्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची. कारण असंख्य कंपन्या म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा नोंदण्या झालेल्या आहेत. तर मग या सर्व कंपन्यामधून योग्य कंपनी कशी ओळखावी, तर याचे उत्तर सुद्धा आपल्याला कोणीही सांगणार नाही. त्याचे कारण म्हणजे आजच्या युगाची स्पर्धा. तो जर त्याचे यशस्वी होण्याचे मंत्र तुम्हाला सांगेल तर मग तुम्ही त्याच्या पेक्षा अधिक शक्तिशाली व्हाल. त्याच कारणाने कोणीही आपल्या मधील गुण कोणालाही शिकवत नाही. होय ! अशीच मानसिकता आहे आजच्या बदलत्या युगाची. तर मग प्रश्न आहे तर याचे उत्तर सुद्धा असेलच. त्याचे उत्तर म्हणजेच अस कि, याची सुद्धा माहिती आपल्यालाच काढावे लागेल. ते आपण अनेक पुस्तकांपासून तसेच गुगल देवताच्या च्या माध्यमातून काढू शकतो. एक सोपी उत्तर आहे कि, आपण ज्या कंपनी च्या वस्तू किंवा अनुभव जाणवला आहे अशाच कंपनी मध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे.

म्युच्युअल फंड मध्ये पैश्यांची वाढ कशी होते ?

               शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड असो या सर्वांची प्रगती नोंदणी झालेल्या कंपनी वर अवलंबून असते. जशी जशी कंपनी वाढेल त्याच प्रमाणे त्यांची विक्री सुद्धा वाढेल. आणि विक्री वाढली तर नक्कीच कंपनी चांगल्या प्रकारचे नफा मिळवू शकते, आणि जर कंपनीला नफा झाला तर त्या नफा मधील एक छोटासा भाग हा त्या कंपनी मधील गुंतवणूकदारांना व्याजाच्या रुपात मिळत असते.

 

शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंडामुळे भारत देशाला फायदा कसा ?

                आता साहजिक आहे कि, जस जश्या भारताच्या कंपन्या वाढेल त्याच प्रमाणे भारत देश सुद्धा आर्थिकरित्या विकसित होणार. आपला भारत देश जर आर्थिकरित्या विकसित करायचा असेल तर मोठ्या कंपन्यांबरोबर छोट्या उद्योजकांना सुद्धा यावर अधिक भार देऊन आपल्या शहराला विकसित करावे लागेल. हीच खरी भारताची प्रगती म्हणून ओळखल्या जाईल.

लोकांचे शेयर बाजार, म्युच्युअल फंड बद्दल चे विचार ?

आता कस आहे, शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड या दोन्ही गुंतवणुकीबद्दल साधारणतः लोकांचे मत नकारात्मक असते ते म्हणजे गुंतवणूक म्हटलं म्हणजे त्यांच्या कढुन एकच उत्तर अपेक्षित असते ते म्हणजे शेयर बाजार मधून लोकांची फसवणूक होते, त्यामुळे आम्ही यात गुंतवणूक करत नाही. आता आपण त्यांच्याशी वाद केल्यापेक्षा त्यांनाच याबद्दल थोडी माहिती समजून सांगितली पाहिजे. या जगात प्रत्येकाला काही ना काही नवीन शिकायचं असत फक्त प्रश्न इथेच निर्माण होतो कि त्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळत. त्यांच्या मनातील जर आपण शेयर बाजार बद्दल शंका काढल्या तर नक्कीच आपण काही तरी नवीन शिकू आणि आपला देश घडविण्यासाठी एक छोटा सहभाग करू.


गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी ?

सर्व तर वाचून झालं पण नक्की सुरुवात कुठुन करावी हाच प्रश्न आपल्याला पडला असेल. खरंच जर आपल्याला याबद्दल काही शिकून पैशाची गुंतवणूक करायची असेल तर सर्वात पहिले त्या कंपनी बद्दल थोडी माहिती जमा करा. नेमक आपल्याला कोणत्या कंपनी मध्ये गुंतवणूक कराची आहे. योग्य कंपनीची जेव्हा निवळ झाली त्यानंतर आपण महिन्याला किती पैसा जमा करू शकतो याबद्दल विचार करून तीच रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. हेच जर आपण सरासरी काही वर्ष करत गेलो तर नक्कीच आपण वयाच्या ४० पर्येंत आर्थिकरित्या स्वतंत्र होऊ शकतो.

तर मग आजच सुरुवात करताय ना !

प्रथमेश राजु गणेशकर
( B.COM, D.TAX, GDC&A )

Friday, October 28, 2022

शिक्षणाचा प्रभाव | POWER OF EDUCATION | The effect of education | The power of education

असे म्हणतात की, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. हे नक्की बरोबर आहे का ? मग आज या विषयावर चर्चा करूया. 

           मूलं जन्माला आली की त्यांच्यावर अभ्यासाचे ओझे टाकले जाते, की माझा मुलगा / मुलगी भरपूर अभ्यास करून आमचे नाव मोठ करणार . अभ्यासाचं ओझं एवढं वाढते की लहान मुलांना त्यांची शाळेची बॅग जड वाटायला लागते. पण काय करणार ? हा नवा भारत आहे, जो जास्त शिकलेला आहे त्यालाच समाजात उच्च दर्जा दिला जातो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असायला पाहिजे. मग तो अभ्यास असो, किंवा मोबाईल फोन !

          शिक्षणातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात ज्या आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही. शिक्षण हे सर्व काही नाही, पण शिक्षणापेक्षा दुसरे कोणते मार्ग आहे. आजकाल शिक्षणाचे सुद्धा प्रकार तयार होत आहेत. कोणी जास्त पैसे देऊन खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत, तर कोणी कमी पैसे देऊन सरकारी शाळेत शिक्षण घेत आहेत. शेवटी, शिक्षण ते शिक्षण आहे, काय ती सरकारी शाळा अन काय ती खाजगी शाळा?
          
        
     शिक्षण हे काय आहे ? ज्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनीअर या पदवीसाठी कित्येक वर्षे शिक्षण घेतले आणि ही पदवी मिळवली. त्यांना विचारा आणि त्या अभ्यासातून ते कुठे पोहोचले ते पहा. आयुष्यात कधीतरी डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्याकडे तर आपल्याला जावं लागतं, तेव्हाच आपल्याला खऱ्या शिक्षणाचा प्रभाव माहिती पडते. 
 
उच्च शिक्षणाने पुढील आयुष्यासाठी खूप काही शिकायला मिळते आणि तसे शिक्षण कधीच पैशाने विकत घेता येत नाही. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर योग्य शिक्षण, अधिक पैसा आणि निरोगी शरीर या गोष्टींचा एकाग्रतेने विचार करून यावर अंमल बजावणी केली पाहिजे.

      केवळ पालकांच्या दबावाखाली येऊन शिक्षण नाही तर, तर आपल्या उज्वल भविष्यात या शिक्षणाचा काय फायदा होईल याकडे लक्ष द्या. या सर्व गोष्टी आपल्याला पुढे जाण्यास नक्कीच मदत करतील.
     
प्रथमेश राजू गणेशकर
 (बी. कॉम, डी टॅक्स ) 

गुंतवणूकीचे फायदे 2 | Benefits of Investment | POWER OF INVESTMENT


भारताच्या इतिहासात प्रगतीची सर्वात मोठी अशी लाट अवघ्या काही वर्षातच येणार आहे त्याचे कारण असे की, भारताच्या लोकसंख्येत 22 टक्के तरुण युवावर्ग ( वयोगट 18-29 वर्षे ) आहेत, यांना आपण भारताची खरी युवाशक्ती देखील म्हणता येईल. तरीही बहुतांश टक्के युवाशक्ती व्यसनांच्या आहारी गेले आहेत. कुठलेही व्यसन माणसाला पैशांनी तसेच शरीराने कमजोर करून टाकतो. तर आज आपण एका कथेच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणुन घेऊया ज्या आपल्याला आपल्या पुढील भवितव्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यांचा आपल्या भावी जीवनात एक मुख्य सहभाग राहणार आहे..

       एका गावात श्याम नावाचा मुलगा राहत होता. गावातला सर्वात श्रीमंत सरपंचाचा एकुलता एक मुलगा. आणि जसा श्याम तसेच त्याचे मित्रगण. ते म्हणतात ना की, वाईट सोबतीचा असर खूप वाईट असतो. वयाच्या अवघ्या काही वर्षात त्यानी व्यसनाला सुरूवात केली. दिवसातला बहुतांश वेळ तो व्यसन करायचा. त्याच्या शाळेतील शिक्षक त्याला नेहमी सांगायचे वयवर्ष 20 ते 30 हे जीवन घडविण्याचं राहत असे. हेच १० वर्ष आपले खरे आयुष्य घडवत असे. पण मात्र श्याम ने वयाच्या विसाव्या वर्षी पासुन आपल्या मित्रांना पाहून सिगारेट ओढण्यास सुरूवात केली. सिगरेट च्या आहारी तो जास्त प्रमाणात गेला होता. दररोज 60 रुपये तो त्यात घालवायचा. महिन्याला 1800 रुपये तसेच वर्षाला त्याचे 21,600 रुपये धुव्याच्या रुपात उडून जायचे. आनंद हा मात्र काही वेळ असतो पण त्या व्यसनामध्ये लागलेला पैसा परत येत नाही. असेच करता करता काही वर्ष निघून गेले.

             ते म्हणतात ना 'देर आये पर दुरुस्त आये' हळू हळू जसे त्याचे पैसे संपायला लागले तसे तसे त्याचे व्यसनी मित्र त्याचा साथ सोडू लागले. एक दिवस आला तो एकटाच स्वतःचा विचार करू लागला की, आपले बाबा गावचे सरपंच आणि आपण त्यांनी आयुष्यात कमावलेली पूर्ण इज्जत आपण वाया घालवली. त्याला त्याची चूक वयाच्या 30 व्या वर्षी कळली. जेव्हा हातात एक रुपया सुद्धा थांबत नव्हता. घरच्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. जबाबदारी माणसाला सर्व काही शिकवते. 

       त्यानी ठरवले की, जे काही १० वर्षात झाले ते बरोबर नाही झाले व तसेच स्वःतावर नियंत्रण ठेवण्यास सुरू केले. विचार पक्का केला आणि 30 व्या वर्षीपासुन व्यसन करणे पूर्णपणे बंद केले. आणि तेच 1800 रुपये जे त्याचे महिन्याला व्यसनात जायचे त्या पैशाला योग्य मार्गी म्हणजे एका INDEX FUND / MUTUAL FUND मध्ये गुंतवणूक सुरू केली. काही महिने त्याला त्रास झाला, भरपूर समस्या त्याच्या समोर आल्या पण जेवढ्या जिद्दीने तो व्यसन करायचा तेवढ्याच जिद्दीने तो दर महिन्याला आपल्या पैशाची गुंतवणूक करायचा. त्याला हळू हळू आपले जुने दिवस आठवायला लागले. ते आठवून तो खूप निराश व्हायचा. आणि म्हणायचा की मी तेव्हाच जर व्यसनांचा दूर राहून गुंतवणूक केली असती तर आता सुखी झालो असतो. पण उशिरा का असो ना त्यानी शेवटी चांगला निर्णय घेतला होता.

      पाहता पाहता वयवर्ष 60 पर्यंत त्यानी पगारातले पैसे शिल्लक काढून काही टक्क्याचा वार्षिक रिटर्न ने 14,25,600 रुपये पेक्षा अधिक रुपये शिल्लक केले. त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती की आपल्या जवळ म्हाताऱ्या वयात येवढी मोठी रक्कम आपण बचत केली. त्या मागची त्याची मेहनत आणि व्यसनावर नियंत्रण ठेवून त्याला हे सर्व शक्य झाले. 


    तसेच मित्रांनो सांगायचं झालं तर सिगारेट बनवणारी कंपनी ITC या कंपनीचा शेअर 2000 साली 18 रुपयाचा होता. पाहता पाहता 22 वर्ष निघून गेले आणि त्या शेअर ची किंमत 2022 व्या वर्षी ३३० रुपयाचा च्या जवळपास आहे. याला आपण उत्तम गुंतवणुकीची ताकद म्हणू शकतो. ( हा शेयर सल्ला म्हणून नाही तर फक्त एक उदाहरण म्हणून आपल्या समोर मांडत आहे ) 

  व्यसन तुमचे आरोग्यचं नाही तर संपत्तीला सुद्धा नुकसान पोहोचवते. व्यसनाला तुमच्या जीवनावर हावी होऊ देण्यापेक्षा तुम्ही व्यसनाचा दूर राहा. आपल्या भविष्याचे लवकरात लवकर योग्य निर्णय घ्या. आपले दिवस आपणच बदलू शकतो, निच्छय करा आणि आजपासूनच सुरूवात करा एका नवीन जीवनाची...

प्रथमेश राजु गणेशकर
( बीकॉम, डी.टॅक्स )

Friday, June 10, 2022

दहावी आणि बारवीचा रिझल्ट लागला ! सल्यांपासून सावधान | 10th and 12th results are out! Beware of advice...

    वर्षभर अभ्यास करून अवघ्या तीन तासाचे प्रयत्न नक्कीच आपल्याला भविष्यापर्यंत अतिवेगाने पोहोचवत असते. दहावी असो की बारावी रिझल्ट लागल्यावर आपली धावपळच सुटते की आता पुढे काय करायचं?
 रिझल्ट लागल्यावर आपल्याला सल्ला देणारे असंख्य लोक आपल्याला आढळते. काही म्हणतात डॉक्टर हो, इंजिनिअर हो तर काही म्हणतात वकील हो. असे अनेक सल्ले देणारे लोक आपल्याला आढळते. ज्यांना त्यातलं काहीच माहिती नाही असे लोक सुध्दा आपल्याला सल्ले देत असतात. आणि त्या सल्ल्यांमुळे आपले डोक गोंधळून जाते. समजत नाही काय करावं तर. 
       आता मला सांगा पेपरसाठी अभ्यास तर आपणच केला आहे तर मग काय खरं ! अन काय खोटं ! आहे हे तर आपल्याला समजायला पाहिजे. त्यांनी म्हटल की ह्या क्षेत्रात जा छान आहे थोड कठीण आहे पण हे छान आहे, तर आपण लगेच धावपळ करतो त्या मार्गी जायला. जर अभ्यास आपणच केला तर आपल्याला सुद्धा माहीत असायला पाहिजे की काय आपल्याला उत्तम रित्या झेपणार. कशात आपण आपले करिअर घडवू शकतो. 
  पुढे काय करावं यातच आपण गोंधळून जातो. आणि मग चुकीचा निर्णय घेतो. चर्चा करायचीच असेल तर क्लासेस मधील आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक किंवा शिक्षिका राहतातच त्यांच्याशी चर्चा करा, जे आपल्या कार्यात यशस्वी झाले त्यांच्याशी चर्चा करा. यशस्वी लोकांसोबत चर्चा करा. आपल्याला नक्कीच त्यात यश मिळू शकते. दहावी नंतर बरेचशे रस्ते आपल्यासाठी मोकळे असतात. कला, वाणिज्य, विज्ञान, आय टी आय तसेच इंजिनियरिंग अशा अनेक क्षेत्रात आपण आपले भविष्य घडवू शकतो. या व्यतिरिक्त अजूनही अनेक क्षेत्र आहेत. आपल्याला पुढे अनेक संकटे आपल्या सोमोरे येऊ शकते तर आपण भान राहून आपले करिअर निवडले पाहिजे. 

  योग्य चर्चा कोणाबरोबर करावी ? 
 
            क्लासेस मधील आपले शिक्षक किंवा शिक्षिका राहतात त्याच्याबरोबर चर्चा करायची त्यांना नक्कीच इतरांपेक्षा जास्त माहिती असते. कला वाणिज्य विज्ञान तसेच इंजिनियरिंग अशा क्षेत्रात जे यशवी झाले आहे त्यांच्यासोबत चर्चा करा. अनेक करिअर मार्गदर्शक असतात त्यांच्याकडून थोडी माहिती घ्यायची. नक्कीच अशा सर्व गोष्टी आपल्याला आपल्या कमी पडू शकते. शेवटी अभ्यास तर आपणच केला आणि करिअर आपल्यालाच घडवांव करावं लागतं. सर्वांकडून माहिती गोळा करून आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र आपण करिअर म्हणून निवडावे. 

 तसेच बारावी उत्तीर्ण झालेल्यांना जवळपास माहितीच असते की आपण काय करू शकतो. आणि बारावी पासुन चे शिक्षण हे कदाचित दहावी च्या निर्णयावर अवलंबून असते. बारावी नंतर अनेक जबाबदारी आपल्या पुढे येतात. तसेच उच्च शिक्षणाला असंख्य असा पैसा सुध्दा लागतो. म्हणून जे आपल्याला झेपत असेल असेच क्षेत्र निवडावे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट असे जे सर्विस इंडस्ट्रीज आणि सरकारी नोकरीची तयारी आपण दहावी पासूनच केली तर नक्कीच आपल्याला पुढे याचा फायदा होऊ शकतो. 

आणि जे विद्यार्थी व विद्यार्थीनी यात नापास सुद्धा झालेले आहेत त्यांनी निराश न होता अधिक मेहनतीने पुढील पेपरसाठी तयारी करायला आत्तापासूनच सुरूवात करायला हवी. आणि आपण कुठे कमी पडलो याचे नक्की भान असूनच आपण अभ्यास केला पाहिजे. जसे वाघ शिकार करण्यासाठी दोन पाऊले मागे घेऊन शिकार करतो असेच आपण नापास झालो की पुन्हा तयारी करायला हवी. पुन्हा एक नविन धेय ठेवायला हवे.

सर्व दहावी व बारावी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीचे मनपूर्वक अभिनंदन. 


     प्रथमेश राजु गणेशकर

My Blog List